आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली

- सुरेश भट

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे..

रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे…

- सुरेश भट

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग…

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग…

दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग…

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग…

ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग…

काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग….

- सुरेश भट

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे

उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

- सुरेश भट

उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू…
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला…
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे….
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी…
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
- एल्गार, सुरेश भट

मी – ती…

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

 

http://marathikavitaa.blogspot.com/  http://hindikavitaa.blogspot.com/

Never tell ur problems to anyone… 20% don't care and the other 80% r glad u have them.

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

- सुरेश भट

क्षण चालले, दिन चालले
 
क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही

आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही

इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही

या चुंबनातुन कोण ते, तू जहर हे आहे दिले ?
फुलते कसे गाणे पुन्हा, ह्या पोळल्या ओठातही ?

क्षण चालले, दिन चालले…. पण थांबलो मागेच मी
आता नको, ठेऊस तू, मजला तुझ्या स्मरणातही


 
— अनामिक 
http://marathikavitaa.blogspot.com/  
आयुष्य तेच आहे
 
आयुष्य तेच आहे
रोग जुनेच आहेत
उपचार घेतो त्याला
नाव नवेच आहे

आयुष्य तेच आहे
स्वप्नं खोटेच आहे
भानावर येताच
वास्तवाचे चटकेच आहे

आयुष्य तेच आहे
मधूर गाणेच आहे
निसर्ग छेडी संगीत
लयबद्ध होणेच आहे

आयुष्य तेच आहे
माणसांचे मळेच आहे
एखादं दुसरा सजीव
बाकी निर्जीव पुतळेच आहे

आयुष्य तेच आहे
सांगतात सारेच आहे
एक सारखं वाटतं नाही
आयुष्य कुठेच आहे

आयुष्य तेच आहे
अधांतरी वाटेचं आहे
मृत्यूच एक सत्य
बाकी खोटेचं आहे

आयुष्य तेच आहे
सौंदर्यांवर भाळलेच आहे
मी मागितला चंद्र
हात पोळलेच आहे

आयुष्य तेच आहे
वेडे म्हणणारे खुळेच आहेत
शहाण्यांची ओळख
वेड्यां मुळेच आहे

आयुष्य तेच आहे
प्रश्न वाकडेच आहे
मनाला जे पटतं
मेंदूसाठी कोडेच आहे

आयुष्य तेच आहे
हलके फुलकेच आहे
आठवणी राहील्या मागे
समाधान इतुकेच आहे

कारण हे वयच असं असतं….

पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते..
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते….
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात…
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात…
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत….कारण हे वय असंच असतं…..

कुठून येतं फुलपाखरू??
कुठे निघुन जातं ??
चिमटीत उरतो रंग
तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं….
भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं…..कारण हे वयच असं असतं….

सप्तरंगी स्वप्नांचे दिवस..
वाऱ्यासारखे निघून जातात..
जगाने दिलेल्या जखमांवर..
हळूवार फुंकर घालतात..
जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..?
कारण हे वयच असं असतं..

PRADYUMNA JOSHI  – ( http://www.orkut.com/Profile.aspx?uid=8829865825275982097 )
-
http://marathikavitaa.blogspot.com/   http://hindikavitaa.blogspot.com/

hide totop